::- तुझ्याविना दिवस कसा गेला -::

कस सांगु, तुझ्याविना माझा दिवस कसा गेला
एक एक क्षण आज जड भासत होता मला...
खूप उत्साहात आजचा हा दिवस उजाडला होता
तुझा आवाज कानी पडेल आज
तुझा चेहरा दिसेल आज
मला विश्वास वाटला होता...
सकाळ तशीच निघून गेली...
उगाच मनाला वाटल तु माझी आठवण केली
पण आपल्या बोलण्याची आजुन वेळ नव्हती झाली...
सूर्य चडला डोक्यावरती जसा
उन्माद मनात तसा वाढत होता
कधीही वाजेल फोनची घंटा
म्हणुन मी फोन नजरे समोरच ठेवला होता...
दुपार सरली रात्र आली
तु काही फोन केला नाही
तुझ्या आठवणीत आज
माझ्याने एक घासही गेला नाही...
अशी अवस्था करशील तु अस वाटल नव्हत आधी,
तु तर आहेच मोहिनी स्वप्नपरी
गुंतला कवी तुझ्या आठवणीत
यात तुझा काही दोश नाही..
माझीच कीव येते मला
आठवणीत तुझ्या मला अजुन तडपायच नाही
म्हणुन जा आज मीच तुझ्याशी बोलणार नाही...

Poem by- Vinod Jadhav  

Comments

Popular posts from this blog

TUJHI AATHVAN KHUP YETE

KAS SANGU TULA

FAKT TUZYA SATHI